मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा ग्रह रास बदलतात तेव्हा त्याचा परिणाम राशींवर होत असतो. राहू-केतूच्या गोचर स्थितीमुळे तीन राशींवर मोठा परिणाम होणार आहे. ज्योतिष शास्त्रात राहु हा भय, दुष्कर्म, संकट णि उत्कटतेचा कारक मानला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केतू व्यक्तीच्या कुंडलीत ज्या घरामध्ये आहे त्यानुसार परिणाम देतो.12 एप्रिलपासून मेष, तुळ आणि धनु राशीवर गंभीर परिणाम होणार आहे. 
राहू-केतूच्या संक्रमणामुळे काय नकारात्मक परिणाम होणार जाणून घेऊया. 


मेष (Aries) : नात्यांमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 


तुळ (Libra) : बेजबाबदारपणा चांगला नसेल त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. आर्थिक चणचण भासू शकते. नकारात्मक प्रभाव पडू शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काळजी घ्या. 


धनु (Sagittarius) : धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अशुभ असणार आहे. आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. चुकीचे आर्थिक निर्णय घेतल्याने नुकसान होऊ शकते.


(Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)