मुंबई : राखी पौर्णिमा. बहीण-भावाचा पवित्र सण रक्षाबंधन. देशात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.  या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो मिळो म्हणून प्रार्थना करते.  दि. २६ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. राखी बांधताना  ताम्हण किंवा ताटात ७ वस्‍तू आवर्जुन असाव्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- कुंकू : कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी कुंकू लावणे शुभ मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायू होण्याची कामना करते.  


- अक्षता : कुंकू लावल्यानंतर कपाळावर तसेच डोक्यावर अक्षता टाकतात.  याचा अर्थ भावावर शुभता बनलेली राहो. म्हणून ताटात अक्षता असाव्यात.


- नारळ : नारळ म्हणजे श्रीफळ.  श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे फळ देताना बहिणीने प्रार्थना.


- रक्षा सूत्र, राखी :  रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. या दोषांमुळेच शारीरिक आजार उद्भवतात. मनगटावर रक्षा सूत्र बांधल्याने शरीरात यांचे संतुलन राहते.


- गोड पदार्थ :  राखी बांधल्यानंतर भावाला गोड खाऊ घातल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो.