Success Mantra By Chanakya:  आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील विविध गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी जीवनाबाबत मांडलेली तत्त्व अजूनही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे चाणक्य नीतिबाबत आजही चर्चा होत असते. आचार्य चाणक्य (Aacharya Chanakya) यांना राजकारण आणि नीतिमत्ता यांची चांगली परख होती. कधी कधी आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात. अशा परिस्थितीत शिकण्यासाठी नेहमीच वाव असतो. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, एखाद्या व्यक्तीने गाढवाकडून (Donkey) काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. यामुळे जीवनात यश मिळू शकते. गाढवाकडून तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत असे आचार्य चाणक्य (Chanakya Niti) सांगतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष्यात समाधानी राहा: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार गाढव जीवनातील प्रत्येक गोष्टीत समाधानी असतो. कुठेही काहीही द्या चालत असतो. त्याचप्रमाणे ज्ञानी माणसाने सुद्धा प्रत्येक गोष्टीत समाधानी असले पाहिजे. निकालाची काळजी करू नका, फक्त मेहनत आणि प्रामाणिकपणे तुमचे काम करा. यश एक दिवस नक्कीच पायाशी येईल. 


आळस सोडून द्या: चाणक्य म्हणतो की प्रत्येकामध्ये काहीतरी खास असते. त्याचप्रमाणे गाढवामध्येही एक गुण आहे की, त्याला आळस नसतो. थकलेले असूनही गाढव ओझे वाहून नेतो. त्याचप्रमाणे हुशार व्यक्तीही आळस न करता आपले ध्येय साध्य करू शकते. यासोबतच व्यक्तीने आपल्या ध्येयापासून कधीही विचलित होऊ नये.


काम करत राहणं: जसे गाढव प्रत्येक स्थितीत आपले काम करत असते. त्याच्यावर थंडी किंवा उष्णतेचा अजिबात परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे माणसाने हवामानाची चिंता न करता काम करत राहावे. जर एखादी व्यक्ती हवामानातील बदलामुळे विचलित झाली असेल तर ते त्यांचे ध्येय गमावू शकतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)