ब्रेडा : हॉकीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला आहे. ठरलेल्या वेळेमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये १-१ची बरोबरी झाली. त्यामुळे पेनल्टी शूट आऊट घेण्यात आला. पेनल्टी शूट आऊटमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा ३-१नं पराभव केला. ऑस्ट्रेलियानं १५व्या वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा मान पटकवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोवर्सनं मॅचचा पहिला गोल करून ऑस्ट्रेलियाला १-० ची आघाडी मिळवून दिली. यानंतर विवेक सादर प्रसादनं गोल करून मॅच बरोबरीमध्ये आणली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये सरदार सिंह, मनदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांना पहिल्या ३ संधींमध्ये गोल करता आला नाही. पण मनप्रीत सिंहनं गोल केला. ऑस्ट्रेलियानं मात्र तोपर्यंत ३ गोल केले होते.


शनिवारीच भारतानं नेदरलँडविरुद्धची मॅच १-१नं बरोबरीत रोखत चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल गाठली होती. फायनलमध्ये मात्र भारतीय टीमला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.