नवी दिल्ली : दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वीच टीम इंडियाचे दोन शिलेदारांना टीम इंडियातून बाहेर पडावं लागलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये खेळू शकणार नाहीत. बीसीसीआयनं आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिलीय. सोबतच यामागचं कारणंही त्यांनी स्पष्ट केलंय. 


'बीसीसीआय'नं दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर आणि धवननं टीम सिलेक्टर्स आणि मॅनेजमेंटकडे खाजगी कारणास्तव सुट्टीची मागणी केलीय. त्यामुळे ते दुसऱ्य़ा टेस्ट मॅचमध्ये दिसणार नाहीत. 


मात्र, तिसऱ्या टेस्टमॅचमध्ये शिखर धवन खेळताना दिसेल.  


भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डन्स टेस्ट मॅचमधली पहिली मॅच रोमांचक पद्धतीनं ड्रॉ झाली. मॅचच्या शेवटच्या दिवशी भारतानं दमदार प्रदर्शन केलं. कॅप्टन कुमार कोहलीनं शानदार शतक ठोकलं. तर भुवनेश्वर कुमारनं चार विकेट घेतले.