मुंबई : भारतीय टीममध्ये सध्या वाद सुरु असल्याच्या चर्चा आहेत. इंग्लंड दौऱ्यादरम्यान विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि शिखर धवनची ​पत्नी आयशा यांच्यात वाद झाला. यानंतरच शिखर धवनला टीममधून बाहेर केल्याची देखील चर्चा आहे. पण इंग्लंडमधील टेस्ट सीरीजनंतर शिखर धवनने आशिया कपमध्ये चांगली कामगिरी केली होती.


खेळाडूंच्या पत्नींमध्ये वाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कपमध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. ए​​का रिपोर्टनुसार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचा रोहित शर्माची पत्नी ऋतिका सजदेह आणि शिखरची पत्नी आयशा मुखर्जीसोबत वाद सुरु आहे. यामुळेच धवन आणि रोहित शर्माचा इंडिज विरुद्ध सिरीजसाठी संघात समावेश न केल्याचं देखील बोललं जात आहे. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


विराटच्या वक्तव्यांच्या संबंध काय?


विराट कोहलीने पत्रकारांशी बोलतांना म्हटलं होतं की, टीममध्ये खेळाडूंचा समावेश ही निवड समिती करते. त्याच्या या वक्तव्याला देखील या प्रकरणाशी जोडून पाहिलं जात आहे. अनुष्काने इंग्लंड दैऱ्यावर आयशा आणि तिच्या परिवाराबाबत काही तरी वक्तव्य केल्यामुळे हा वाद सुरु झाल्याचं बोललं जात आहे. ही गोष्ट इतर खेळाडूंच्या कानावर देखील गेली. त्यानंतरच शिखर धवनला संघातून बाहेर केल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.