मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडेसाठी टीम इंडियाची रविवारी घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये युवराज सिंग आणि सुरेश रैना यांना स्थान देण्यात आलेले नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोनही क्रिकेटर्सना श्रीलंका दौऱ्यात स्थान देण्यात आले नव्हते त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडेतही त्यांना संघातून वगळण्यात आलेय, त्यामुळे युवी, रैनाच्या फॅन्सनी सोशल मीडियावर विराट कोहलीवर टीकेची झोड उठवलीये.


युवराज आणि रैना अनेक वर्षांपासून संघात खेळत आहे. युवराजने तर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी यशस्वी लढा देत संघात पुनरागमन केले. मात्र अनेक महिन्यांपासून ते संघापासून दूर आहेत. रैना तर दोन वर्षापूर्वी अखेरची वनडे खेळलाय. त्यामुळे या दोघांचाही संघात समावेश न केल्याने त्यांच्या फॅन्सनी विराटवर जोरदार टीका केलीये.


सुरेश रैनाच्या फॅन्सनी तर ट्विटरवर #BringBackRaina या हॅशटॅगसह आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी तर विराटवर निशाणा साधताना त्याने केवळ आयपीएलमधील आपल्या संघातील सहकाऱ्यांना घेतलेय अशी टीका केलीये.


तर दुसरीकडेही युवराजच्या चाहत्यांनी #BringBackYuvi हा हॅशटॅग वापरत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चाहत्यांच्या मते संघातील मधल्या फळीत नंबर ४ वर युवराजपेक्षा दुसरा कोणता चांगला खेळाडू असूच शकत नाही.