Harmanpreet Kaur runout : टीम इंडियाची माजी कर्णधार डायना एडुल्जी (Diana Edulji) ने हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सेमीफायनलमध्ये ज्या पद्धतीने रनआऊट झाली, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 5 रन्सने हरवलं. यावेळी हरमनप्रीत कौरच्या रन आऊटवर टीका करण्यात आल्या. यावेळी डायना एडुल्जी यांच्या एका वक्तव्याने खळबळ माजली आहे. 


सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 172 रन्स केले. 173 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला केवळ 167 रन्स करता आले. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) सर्वाधिक रन्स केले. मुळात ती जोपर्यंत क्रीजवर होती तोपर्यंत टीम इंडिया (Team India) विजयी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती रनआऊट होताच टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या.


Harmanpreet Kaur ला सुनावले खडे बोल


आयसीसी महिली टी-20 वर्ल्डकपमध्ये हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ज्या पद्धतीने फलंदाजी करत होती, त्यावर डायना यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. डायना म्हणाल्या, "तिच्या म्हणण्यानुसार तिची बॅट अडकली. मात्र तुम्ही तिचा दुसरा रन बघाल तर ती जॉगिंग करत होती. जेव्हा तुम्हाला माहिती असतं की, तुमची विकेट इतकी महत्त्वाची आहे, तेव्हा तुम्ही इतक्या आरामात कसे धावू शकता? त्यावेळी तुम्हाला जिंकण्याच्या उद्देशाने खेळलं पाहिजे. शिवाय हरमनप्रीतने तिची बॅट डाव्या हातात पकडली होती, जे योग्य नाही."


हरमनप्रीत सोबत नेमकं काय घडलं?


टीम इंडियाच्या कर्णधारासोबत जे घडलं, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 15 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हरमनप्रीतन रन घेण्यासाठी गेली. क्रीझमध्ये पोहोचण्यापूर्वी बॅट मातीमध्ये रुतली आणि अडकली. बॅट एवढी जोरात रुतली होती की ती काढणं कठीण होतं. यामुळे हरमनप्रीत रनआऊट झाली.


इंग्लंडच्या माजी कर्णधाराची कौरवर टीका


इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसैन यांनी तिच्यावर टीका केलीये. हुसैन यांच्या म्हणण्याप्रमाणे, हरमनप्रीतने अगदी शाळकरी मुलीसारखी चूक केली आहे. दरम्यान तिनेही हुसैन यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. 


हरमनप्रीतचं हुसैन यांना प्रत्युत्तर


हरमनप्रीतने तिचं अर्धशतक पूर्ण केलं आणि टीम इंडियाची बुडती नौका वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र टीम इंडियाला केवळ 167 रन्स करता आले. सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीत म्हणाली, असं म्हणाले का ते? याबाबत मला माहिती नाही. पण त्या ठिकाणी काहीतरी घडलं. क्रिकेट सामन्यांमध्ये मी अनेकदा फलंदाजांसोबत असं घडताना पाहिलं आहे. तिची बॅट अडकली. माझ्यासाठी हा फार अनलकी दिवस होता.