मुंबई : आशिया कप 2022 मध्ये भारताच्या पाकिस्तान सामन्यापूर्वी भारताच्या लेग-स्पिनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताचा माजी लेगस्पिनर राहुल शर्माने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. राहुल शर्माने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून वनडेमध्ये पदार्पण केले होते. (Rahul Sharma has announced his retirement from international and domestic cricket) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारतासाठी चार एकदिवसीय सामने खेळले असून सहा विकेट्स घेतल्या आहेत. त्याच टी20 फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या नावावर तीन विकेट्स आहेत. राहुल शर्माने भारताकडून शेवटचा सामना 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या 44 सामन्यांमध्ये 40 विकेट घेतल्या होत्या.