मुंबई : टीम इंडिया सध्या श्रीलंका विरुद्धच्या टी 20 सामन्याची तयारी करत आहे. टी 20 चा पहिला सामना लखनऊ इथे होणार आहे. 24 फेब्रुवारी पासून टी 20 चे सामने सुरू होणार आहेत. सध्या रोहित शर्मा टीमसोबतच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. रोहितने सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंके विरुद्ध टी 20 सीरिजनंतर 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी सध्या रोहित शर्माच कर्णधार असणार आहे. कसोटी आणि टी 20 सीरिजपूर्वी रोहित शर्मा खूप आनंदी असल्याचं दिसत आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 


या फोटोवर रोहितची पत्नी रितिकाने देखील कमेंट केली आहे. या कमेंटमुळे सर्वांच्या नजरा रितिकाच्या म्हणण्याकडे वळल्या आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. रितिकाने रोहित शर्माची मस्करी केली आहे. यावेळी रितिकाने एक मिश्कील तक्रारही सोशल मीडियावर केली. 



सगळं ठिक आहे पण तू मला कॉलबॅक करू शकतो का? असा प्रश्न रोहितला रितिकाने विचारला आहे. टीम इंडियाचे खेळाडू 2022 च्या सुरुवातीपासून क्रिकेट सामने खेळण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे गेले काही दिवस ते कुटुंबापासून दूर आहेत. त्यामुळे रितिकाने अशी कमेंट केल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 


बीसीसीआयने श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या टी 20 आणि कसोटी सीरिजसाठी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे दिली आहे. सध्या रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार आहे. संजू सॅमसनला देखील संधी दिली आहे. रोहित शर्माने अनेक युवा खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी दिली आहे.