मुंबई : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज रात्री 9 वाजता डब्लिन येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे असणार आहे. दरम्यान या सामन्यात कोण-कोणत्या खेळाडूंना संधी मिळते हे पहावे लागणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा युवा खेळाडू उमरान मलिक पदार्पणासाठी उत्सुक होता. मात्र त्याला संपुर्ण मालिका बेंचवर बसवून ठेवले होते. टीम इंडियामध्ये निवड होऊनही या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये का संधी मिळत नाही, असा प्रश्न पडलाय. दरम्यान आज हार्दिक पांड्या या खेळाडूला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पदार्पणाची संधी देऊ शकतो, हे पहावे लागणार आहे. 


भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी देण्यात आली नव्हती. उमरानला संधी न देता भारतीय संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल यांना संघात आणले होते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली होती. इतक्या प्रतिभावान खेळाडूला मैदानात न उतरवल्याने टीकाही होत होती.


150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी


उमरान मलिकबद्दल सांगायचे झाले तर, तो ताशी 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्यात माहीर आहे. उमरान मलिकने सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएल 2022 च्या 14 सामन्यांत 22 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने चार आणि एकदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला. आयपीएलच्या 15 व्या मोसमात त्याची धारदार गोलंदाजी पाहून प्रत्येकजण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत.