मस्कट : भारतीय पुरुष हॉकी संघानं एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारलीय. उपांत्य फेरीत भारतानं जपानला ३-२ नं पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत भारताचा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी रंगणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानविरुद्ध भारताकडून गुरजंत सिंग, चिंगलेनसना आणि दिलप्रीत सिंगनं गोल झळकावले. अखेरच्या पाच मिनिटांमध्ये गोल झळकावत भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जपानला पराभवाचा धक्का दिला.


मस्कट येथे आज रात्री १० वाजून ४० मिनिटांनी भारत विरुद्ध पाकिस्तान मुकाबला रंगणार आहे.