चेन्नई : आयपीएल २०१९ मधला पहिला प्ले-ऑफचा सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या सामन्याबद्दल मुंबई आणि चेन्नईच्या क्रिकेट रसिकांमध्ये कमालीचा उत्साह आहे. या उत्साहामध्ये मद्रास आयआयटीही मागे नाही. टॉस जिंकल्यानंतर धोनीने बॅटिंग घ्यावी का बॉलिंग? असा सवाल आयआयटी मद्रासने प्रश्नपत्रिकेत विचारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने ही प्रश्नपत्रिका ट्विट केली आहे. खऱ्या आयुष्याशी निगडित प्रश्न विचारणाऱ्या मद्रास आयआयटीचे प्रोफेसर विग्नेश यांचं अभिनंदन, असं ट्विट आयसीसीने केलं आहे. ४० मार्कांच्या या परिक्षेत मद्रास आयआयटीने या प्रश्नाला ५ मार्क दिले आहेत.