मुंबई : आयपीएल सामन्यात शुक्रवारी राजस्थान रॉयल्स संघाकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव झाला. यानंतर राजस्थान रॉयल्सने फायनल सामन्यात प्रवेश केला तर बंगळुरू आयपीएलमधून बाहेर झाला. बंगळुरूच्या या पराभवानंतर अपयशाचे खापर विराटवर फोडले जात आहे. तसेच चहूबाजूंनी त्याच्यावर टीका होतेय. या टीकाकारांना आता विराट कोहलीने प्रत्युत्तर दिले आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीची पोस्ट 
विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट लिहली आहे. या पोस्टद्वारे त्याने टीकाकारांना सुनावले आहे. तो म्हणतो की, कधी कधी तुम्ही जिंकता, तर कधी तुम्ही अपयशी ठरता. पण जो 12 खेळाडू होतो, तो अप्रतिम होता, संपूर्ण स्पर्धेत तू आम्हाला साथ दिलीस. तुम्ही क्रिकेटला खास बनवता. शिकणे कधीच थांबत नाही. व्यवस्थापन, सहाय्यक कर्मचारी आणि या अद्भुत फ्रँचायझीचा भाग असलेल्या सर्वांचे खूप खूप आभार. पुढच्या हंगामात भेटू, असे लिहत त्याने हार्ट इमोजी टाकले आहे. 



आयपीएल कामगिरी 
IPL 2022 च्या 16 सामन्यांमध्ये विराट कोहलीने 341 धावा केल्या आहेत. IPL 2022 मध्ये विराट कोहलीला तीनदा न खाते उघडता आऊट झाला म्हणजेच गोल्डन डकचा शिकार झाला. तो आरसीबी संघाची सर्वात मोठी कमजोरी बनला होता. गेल्या दोन वर्षांपासून कोहलीला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे तो फॉर्मपासून झूंजताना दिसतोय.