नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान ४ जूनला एकमेकांसमोर येणार आहेत. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी एक युद्धच असते. पण त्यापूर्वीच आता पाकिस्तानच्या खेळाडूंकडून प्रतिक्रिया येणं सुरु झालं आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानच्या बॉलरकडू टार्गेट केलं गेलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा गोलंदाज जुनेद खान याने किस्तान मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, भारताचा कर्णधार विराट कोहली हा तल्लख फलंदाज असला तरी त्याची डाळ माझ्यापुढे शिजत नाही. कारण जुनेदने चारपैकी तीन वेळा कोहलीला आऊट केलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील विराटची विकेट सहज काढेल असं त्याने म्हटलं आहे.


विराटला डिवचणाऱ्या जुनेदला काल झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगलेच धुतले. हे आवर्जून नमूद करावे लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात जुनेदच्या नऊ षटकांमध्ये 73 धावा तडकावण्यात आल्या.


कोहली आणि जुनेद आता ४ वर्षानंतर एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे ४ जूनला आता विराट त्याच्या बॅटने जुनादला कसं उत्तर देतो हे पाहावं लागेल.