गॉल : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होतेय. या पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्या कसोटीत पदार्पण करु शकतो असे संकेत विराट कोहलीने दिलेत. पंड्याला अंतिम ११मध्ये स्थान मिळू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्याकडे हार्दिक पंड्यासारखा क्रिकेटपटू ज्यात विकेट घेण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे संघात समतोल साधला जाईल, असे विराट म्हणाला. 


नियमित सलामीवीरांच्या अनुपस्थिती रोहितला सलामीची संधी मिळणार का असे विचारले असता विराट म्हणाला, रोहित शर्माने आतापर्यंत कधीही कसोटीत सलामीवीराची भूमिका बजावलेली नाहीये. तसेच पहिल्या कसोटीत हा प्रयोग आम्ही करणार नाही कारण आमच्याकडे स्पेशल सलामी फलंदाज आहे आणि तोच खेळाची सुरुवात करेल.