मुंबई : आयपीएल सीजन 11 चा दुसरा क्वालिफायर सामना हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात रंगणार आहे. कोलकाताच्या गोलंदाज चाइनामॅन कुलदीप यादवचं म्हणणं आहे की, ईडन गार्डन्सची विकेट हैदराबादसाठी अडचण ठरु शकते. कोलकाताने बुधवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला होता. क्वालिफायर-1 मध्ये चेन्नईकडून पराभव झालेल्या हैदराबादला आणि कोलकाताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलदीपचं म्हणणं आहे की, केन विलियमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबाद टीमला ईडन गार्डन्सच्या विकेटवर टिकणं सोपं असणार नाही. कोलकात्याकडे होम ग्राऊंड असल्याचा फायदा आहे. आणि मुंबईची वानखेडे पिच देखील ईडनच्या पिचपेक्षा खूप वेगळी आहे.


कुलदीपने म्हटलं की, 'आमच्या खेळणं सोपं असणार आहे. हे आमचं होम ग्राऊंड आहे. येथील परिस्थितीशी आम्ही परिचित आहोत. हैदराबादसाठी मुंबईहून येथे येऊन खेळणं अवघड आहे. येथील विकेट स्पीनर्सला मदत करते.