मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली ११ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले,. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघांनी इटलीमध्ये सिक्रेट वेडिंग तर केलं मात्र लग्नानंतरच्या सगळ्या गोष्टी सोशल झाल्या. यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो, प्री वेडिंग फंकशन्स सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या. मात्र आता चाहत्यांच्या डोक्यात एक प्रश्न आहे की हे दोघे लग्नानंतर मुंबईत राहणार की दिल्लीत. 


रिपोर्ट्सनुसार दोघेही लग्नानंतर मुंबईतील वरळी परिसरात राहायला येणार आहेत. विराट कोहलीने २०१६ साली वरळीच्या ओंकार प्रोजेक्टमध्ये १९७३ च्या टॉवर सीमध्ये ३५ व्या माळ्यावर फ्लॅट घेतला आहे. हा एक लक्झरीयस फ्लॅट अशून ७  हजार १७१ स्वेअर फूटचा फ्लॅट आहे. ओंकार प्रोजेक्टच्या १९७० - ७३ अशा ३ बिल्डिंग आहेत. ज्याच्या प्रत्येक फ्लॅटमध्ये ४ बेडरूम असून त्याची सिलिंग १३ फूट उंच आहे. हा फ्लॅट प्रत्येकाचा ड्रिम फ्लॅट असू शकतो. आणि ज्यामध्ये आता आपले विरूष्का राहणार आहेत. 


असं सांगण्यात आलं आहे की लग्नानंतर २१ डिसेंबर रोजी दिल्लीला दोघांचे ग्रँड रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. या रिसेप्शनच्या निमंत्रणाची पत्रिका सध्या सोशल मीडियात सगळीकडे व्हायरल होत आहे.