मुंबई : आज २४ सप्टेंबर. १० वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने पहिला वहिला टी-२० वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला होता. १९८३ नंतर एखाद्या वर्ल्डकपचा खिताब पटकावण्याचा मान भारताला मिळाला होता. 


या संपूर्ण स्पर्धेत भारताने चांगली सांघिक कामगिरी केली होती. मात्र यात असेही काही भारताचे क्रिकेटर आहेत ज्यांनी या विजयात मोलाची भूमिका बजावली. बीसीसीआयने ट्विटरवरुन २००७च्या वर्ल्डकप विजयाच्या आठवणींना उजाळा दिलाय.