नवी दिल्ली : महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाला भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने शुभेच्छा दिल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. त्याआधी सेहवागने हटके शुभेच्छा दिल्यात. 


सेहवाग म्हणाला, मुलींनी जे करुन दाखवलं ते आपल्या पुरुषांनीही करता आलं. २०१५च्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला होता आणि स्पर्धेबाहेर गेला होता. मात्र मुलींनी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली.