नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक ठोकलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितने ९४ चेंडूत हे शतक साकारले. यात ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. सलामीवीर अजिंक्य रहाणेने ६१ धावा केल्या. भारताने एक विकेट गमावताना दोनशेचा टप्पा गाठलाय.


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकताना प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ९ बाद २४२ धावा केल्या. सलामीवीर डेविड वॉर्नरने दमदार अर्धशतक झळकावले.