मुंबई : आयपीएलमधील सर्वात चुरशीचा सामना आज होणार आहे. मुंबई विरुद्ध कोलकाता सामना होणार आहे. रोहित शर्मा विरुद्ध श्रेयस अय्यक आज या सामन्यात कस लागणार आहे. मुंबई टीमला आतापर्यंत एकही सामना जिंकण्यात यश आलं नाही. मात्र आज चमत्कार होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीचा खास प्लेअर आज मुंबई टीमला सामना जिंकवून देऊ शकतो. गेल्या दोन सामन्यात फेल ठरलेल्या या खेळाडूला आज नशीबानं साथ दिली तर आज कोलकाता टीमचं काही खरं नाही. मुंबई टीमला कोलकाताला पराभूत करणं सहज शक्य होऊ शकेल. 


हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आहे. गेल्या 2 सामन्यात बुमराहच्या बॉलिंगवर खूप जास्त धावा विरोधी टीमने काढल्या. दोन सामन्यात बुमराह फ्लॉप ठरला. मात्र यावेळी त्याची कामगिरी चांगली राहिली तर मुंबईचा विजय निश्चित होऊ शकतो. 


मुंबई सामना जिंकण्याची शक्यता 80 टक्क्यांहून अधिक आहे. बुमराह 4 ओव्हरमध्ये भल्याभल्यांची दांडी गुल करू शकतो. आतापर्यंत बुमराहने आयपीएलमध्ये 108 सामन्यांमध्ये  133 विकेट्स घेतल्या.