तिरुवनंतपुरम : भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्य़ामध्ये  न्यूझीलंडवर 6 रनने विजय मिळवत मालिका देखील आपल्या नावे केली. भारताविरुद्ध न्यूझीलंडने पहिल्यांदा टी-20 सीरीजमध्ये 1-2 ने पराभव स्विकारला. यासोबतच कर्णधार विराट कोहलीने आणखी एक मालिका आपल्या नावे केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसामुळे उशिरा सुरु झालेल्या या ८ ओव्हरच्या सामन्यामध्ये 68 रनचं टार्गेट असणाऱ्या न्यूझीलंड संघाला भारतीय गोलंदाजांनी आपल्या बॉलिंगच्या जोरावर जास्त मोठे शॉट खेळण्यासाठी संधीच दिली नाही. दूसऱ्या ओव्हरमध्येच तिसऱ्या बॉलवर रोहित शर्माने कॉलिन मुनरोचा जबरदस्त कॅच पकडला आणि भारताला पहिला विकेट मिळवून दिला.


मुनरोची विकेट भारतासाठी खूप महत्त्वाची होती कारण राजकोटमध्ये त्याने शतक ठोकत भारताचा पराभव केला होता. मुनरोच्या विकेटमुळे भारताची विजयाची संधी वाढली.