नवी दिल्ली : भारताविरुद्धची तिसरी टेस्ट ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे. भारतानं ठेवलेल्या 410 रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेनं पाचव्या दिवशी सावध खेळ करत 299/5 एवढा स्कोअर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचव्या दिवसाची सुरुवात 31/3 अशी केल्यानंतर धनंजय डिसिल्वानं शानदार शतक झळकावलं. 219 बॉल्समध्ये 119 रन्स करून डिसिल्वा रिटायर्ड हर्ट झाला. तर कॅप्टन दिनेश चंडीमलनं 36, रोशन सिल्वानं नाबाद 74 आणि डिकवेलानं नाबाद 44 रन्स बनवल्या.


भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर अश्विन आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक विकेट मिळाली. ही मॅच ड्रॉ झाल्यामुळे भारतानं तीन टेस्टची सीरिज 1-0नं जिंकली आहे. कोलकत्यामध्ये झालेली पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. त्यानंतर नागपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं विजय मिळवला होता.