मुंबई : टी 20 वर्ल्ड कपला (T 20 World Cup 2022) सुरुवात झालीय. अवघ्या काही दिवसांनी वर्ल्ड कपमधील महामुकाबला खेळवण्यात येणार आहे.  23 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हायव्होल्टेज सामन्यात होणार आहे. वर्ल्ड कपपेक्षा क्रिकेट चाहते या सामन्याची आवर्जुन वाट पाहत आहेत. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. (t 20 world cup 2022 ind vs pak highvoltage match may be cancel due to weather report)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हायव्होल्टेज सामन्याआधी हवामान विभागाने 21 ऑक्टोबरला जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारत विरुद्ध पाक सामन्यावेळी मेलबर्नमध्ये पाऊस होण्याची 65 टक्के शक्यता असल्याचा अंदाज आहे. एक्युवेदरनुसार, आज 19 ऑक्टोबरला पाऊस होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही टीममधील हायव्होल्टेज सामना रद्द होण्याची शक्यता आहे.


आकडेवारी कुणाच्या बाजुने?   


टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 11 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 8 वेळा टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर पाक टीम 3 वेळा यशस्वी ठरलीय.