नवी दिल्ली : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटची वन-डे मॅच कानपूरमध्ये खेळली जाणार आहे. ही मॅच जिंकताच टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीरिज सुरु होण्यापूर्वी अंदाज वर्तवला जात होता की, टीम इंडिया न्यूझीलंडला एकही मॅच जिंकू देणार नाही. मात्र, तसं झालं नाही. मुंबईत झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियावर ६ विकेट्सने पराभव करत सर्वांनाच धक्का दिला. न्यूझीलंडच्या बॅट्समनने खेळलेल्या जबरदस्त इनिंगसमोर विराट कोहलीची सेंच्युरी कामा आली नाही.


तर, पुण्यात खेळलेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या टीमचा पराभव करत टीम इंडियाने सीरिज १-१ने बरोबरीत आणली. आता सर्वांच्या नजरा शेवटच्या कानपूर वन-डे मॅचवर लागल्या आहेत.



टीम इंडिया आता न्यूझीलंडच्या पाहूण्यांना कुठलीच संधी देऊ इच्छित नाहीये. त्यामुळेच विराट कंपनीने शेवटच्या मॅचसाठी जोरदार तयारी केली आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या पेजवर टीम इंडियातील सदस्यांचे काही फोटोज पोस्ट करण्यात आले आहेत.



या फोटोजमध्ये दिसत आहे की, रविवारी होणाऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचे प्लेअर्स जिममध्ये वर्कआऊट करत आपला घाम गाळत आहेत.


Image: Indian Cricket Team Facebook

फोटोज पोस्ट करत त्यावर लिहीलं आहे की, मी आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी सर्वकाही करण्यास तयार आहे. भारतीय टीमने जर ही सीरिज जिंकली तर आपल्याच देशात टीम इंडियाची सातवी सीरिज जिंकेल.