मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीनं आयपीएलमध्ये सुरु असलेल्या कॉमेंट्रीवर टीका केली आहे. संजू सॅमसनच्या घरगुती आणि आयपीएलमधल्या कामगिरीवर कॉमेंटेटर्स खूपच बोलत आहेत. दुसऱ्या विषयांवर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही, असं दिसतंय. हे खूपच कंटाळवाणं आहे, असं ट्विट विनोद कांबळीनं केलं आहे. घरगुती क्रिकेटमध्ये नेमकं काय चाललं आहे. आणि कोणत्या खेळाडूंची कामगिरी कशी आहे याबद्दल कॉमेंटेटर्सना काहीच कल्पना नसल्याचं कांबळी म्हणाला आहे. याचबरोबर विनोद कांबळीनं संजू सॅमसनला खुलं आव्हान दिलं आहे. आयपीएलच्या या मोसमामध्ये संजू सॅमसननं शतक मारून दाखवावं, असं ट्विट कांबळीनं केलं आहे.


संजू सॅमसनकडे ऑरेंज कॅप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थानकडून खेळणाऱ्या संजू सॅमसननं ६ मॅचमध्ये सर्वाधिक २३९ रन बनवले आहेत. सर्वाधिक रन करणाऱ्या क्रिकेटपटूला देण्यात येणारी ऑरेंज कॅपही सध्या संजू सॅमसनकडेच आहे.