मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत... आता हे लग्न होणारच, याचा पुरावाच मीडियाच्या हाती लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का - विराटच्या विवाहाच्या बातमीला अनुष्काच्या टीमनं अफवा सांगितलं असलं तरी अत्यंत खाजगीरित्या हे दोघं डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विवाह बंधनात अडकत असल्याचं समोर येतंय.


'टाईम्स नाऊ'नं दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीचे लहानपणीच्या दिवसांतले प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीही या दिवशी सुट्टीसाठी अर्ज केलाय. ते सध्या सी के नायडू ट्रॉफी अंडर-२३ च्या मॅचमध्ये व्यस्त आहेत. ८ डिसेंबर रोजी पालमच्या एअरफोर्स कॉम्प्लेक्स ग्राऊंडवर दिल्ली विरुद्ध तामिळनाडू अशी सेमीफायनलची मॅच रंगतेय.


डीडीसीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटचे कोच राजकुमार शर्मा यांनी काही वैयक्तिक कारणामुळे सुट्टी हवी असल्याचं म्हटलंय... त्यांचा हा अर्ज मंजूर करण्यात आलाय. त्यांच्याऐवजी रॉबिन सिंग ज्युनिअर यांची दिल्ली टीमच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आलीय.


विराटनं आपल्या कोणत्याही खेळाडू मित्राला विवाहासाठी आमंत्रण दिलेलं नाही... परंतु, २१ डिसेंबरला मुंबईत या दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडणार आहे, असं म्हटलं जातंय.