चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातील विजयाचे श्रेय भारताचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पांड्याला दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांड्याच्या जबरदस्त अर्धशतकी खेळीने सामन्याचे चित्रच बदलून टाकले, असे विराट सामना संपल्यानंतर म्हणाला. पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने आता १-० अशी आघाडी घेतली आहे.


पांड्याने ६६ चेंडूत ८३ धावा तडकावल्या आणि धोनीसह चांगली भागीदारी करताना भारताला २८१पर्यंत धावसंख्या गाठून दिली. 


सामना संपल्यानंतर विराट म्हणाला, 'टॉस होत असतानाच आम्ही मोठी धावसंख्या उभारण्याच्या विचारात होतो. सुरुवातीला आम्ही झटपट विकेट गमावल्या. मात्र केदार आणि धोनी यांनी संयमी खेळी केली. हार्दिक आणि धोनी नेहमीप्रमाणे धमाकेदार सांगता केली. हार्दिकचा स्वत:वर विश्वास असतो आणि त्याच्या खेळीने सामन्याचे चित्रच बदलले.'