मुंबई : श्रीलंका सिरीजसाठी माजी कर्णधार विराट कोहलीला आराम देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्याच्या जागी 3 नंबरवर कोणत्या खेळाडूला खेळवायचं हा अडचणीचा प्रश्न आहे. अशातच आता भारताचे माजी फलंदाजीचे कोच संयज बांगर यांनी विराट कोहलीच्या तिसऱ्या जागेसाठी पर्याय सुचवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय बांगर यांच्या मते, इंडियन टीम मॅनेजमेंट श्रेयस अय्यरला तिसऱ्या स्थानासाठी तयार करतंय. सध्या या स्थानावर स्टार खेळाडू विराट कोहली उतरतो. मात्र जर जर विराट कोहलीला दुखाफत झाली तर त्याच्या जागी अय्यर एक चांगला पर्याय आहे.


सध्याची श्रीलंकेची सुरु असलेली सिरीज आणि गेल्या आठवड्यात झालेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विराटला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी दोन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. यावेळी कोलकाताच्या सामन्यात 16 बॉल्समध्ये 25 रन्स तर श्रीलंकेविरूद्ध 28 बॉल्समध्ये 57 रन्स केलेत.


बांगर पुढे म्हणाले, "श्रेयसला ज्या परिस्थितीत फलंदाजीसाठी पाठवण्यात येतंय त्यानुसार त्याला सातत्याने तिसऱ्या नंबरवर पाठवलं पाहिजे. असं होऊ नये पण, विराटला दुखापत झाली तर तिसऱ्या नंबरसाठी श्रेयस अय्यर एक चांगला पर्याय आहे. आणि कदाचित टीम मॅनेजमेंटची नजरही त्यांच्यावर आहे."


श्रेयस अय्यरच्या व्यतिरीक्त सुर्यकुमार यादव, केएल राहुल, त्याचप्रमाणे संजू सॅमसन असे खेळाडू आहेत त्यांना टीममध्ये संधी देण्यात येणारे.