मॅन्चेस्टर : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्या जगाचं लक्ष असतं ते भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यावर. या दोन्ही देशांमधल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये आतापर्यंत पाकिस्तानने भारताचा एकदाही पराभव केलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपमध्ये ६ मॅच झाल्या आहेत. १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११ आणि २०१५ या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडले. यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. 


२०१९ वर्ल्ड कपच्या भारत-पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वर्ल्ड कपमधल्या मॅचबद्दल तुमच्या काही आठवणी असतील त्याही सांगा. या प्रतिक्रिया आम्ही 'झी २४ तास'वर दाखवू. या प्रतिक्रिया कळवताना #क्रिकेट२४तास हा हॅशटॅग वापरा