‘द कपिल शर्मा शो’ कमी कालावधीत लोकप्रिय झाला. त्यातील रिंकू भाभी, डॉक्टर गुलाटी अशा विविध पात्रांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. परंतु, काही महिन्यांपूर्वी सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात वाद झाला. आणि त्या वादाचा परिणाम म्हणजे सुनील ग्रोवरने कपिलचा शो सोडण्याचा निर्णय घेतला. नक्कीच त्याचा परिणाम टीआरपी वर झाला. अगदी कार्यक्रम बंद होणार या चर्चांना देखील उधाण आले. पण, तसं काहीच नसून सोनी वाहिनीने या कार्यक्रमाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


आता ‘द कपिल शर्मा शो’ नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कार्यक्रमात मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा या शो चा टीआरपी वाढतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ च्या संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे निर्माते यात काही महत्त्वाचे बदल करणार असून त्याची तयारी देखील सुरु झाली आहे. परंतु, बदल नेमके कोणत्या बाबतील असतील याबद्दल गुप्तता बागळण्यात आली आहे.


 


अलीकडे हा कार्यक्रम बंद होणार या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम बंद होणार नसून त्यात महत्त्वाचे बदल होणार आहेत. कार्यक्रमाचा घसरलेला टीआरपी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर कार्यक्रमात सेलिब्रेटींचा वावर कमी होणार असल्याचं म्हटलं जातं. परंतु, त्यातील विनोदी पात्रांमध्ये काही बदल होतील का ? हे बघण्यासासाठी अनेकजण आतुरतेने वाट बघत आहेत.