बुलडाणा । बालाकोट हल्ला हा शहीद जवानांना खऱ्या अर्थाने नमन । ग्रामस्थ

Tue, 26 Feb 2019-6:45 pm,

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारताने १२ दिवसानंतर बदला घेतला. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बॉम्ब वर्षाकरीत हल्ला चढवला. या हल्ल्यात पाकिस्तान हद्दीतील बालाकोट येथील अतिरेक्यांचे अड्डे उद्धवस्त झालेत. यासाठी 'मिराज २०००' या लढावून विमानांचा वापर करण्यात आला. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून अतिरेक्यांच्या तळावर हल्ला केल्याने ३०० च्या वर अतिरेकी ठार झालेत. या कारवाईनंतर देशात जल्लोष साजरा होत असताना शहीद जवानांच्या वडिलांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्याला याचा जास्त अभिमान आणि आनंद आहे, असे शहीद जवान नीतीन राठोड यांच्या वडिलांनी म्हटले आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link