मुंबई : मराठी सिनेसृष्टीचं लाडक कपल हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने गेल्यावर्षी ४ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. पुण्यात अतिशय धुमधडाक्यात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली होती. लग्नानंतर ही गोड जोडी एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ कायम शेअर करत असतात. नुकताच हार्दिक जोशीने  त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी कपलच्या पोस्टची त्यांचे चाहतेही नेहमी वाट पाहत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर केलेल्या व्हिडिओत दोघंही खूपच क्यूट अंदाजात दिसत आहेत. 'जाने क्यू लोग प्यार करते है' या गाण्यावर या जोडप्याने रिल क्रिएट केल्याचं दिसत आहे. या रिलवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, राणादा ला सुद्धा तुम्ही गाणी गायला लावली राव अस कुठ असतय व्हय. तर अजून एका युजरने कमेंट करत म्हटलंय की, मस्त जमलय  खुप छान. तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, लग्नाची दोस्ती हाय न्हव मग हे सगळ प्रश्न कसे काय? अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स चाहते तिच्या या व्हिडिओवर शेअर करत आहेत. तर अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या या रिलवर कमेंट करत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'तुझ्यात जीव रंगला' म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी. मालिकेत काम करता करता ही जोडी खरंच एकमेकांच्या प्रेमात पडली. अचानक साखरपुडा करत त्यांनी प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आपल्या प्रेमाची कबुली देत अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली. सध्या हे कपल परदेशात एकमेकांसोबत आपला क्वालिटी टाईम स्पेंण्ड करत आहे.


काही दिवसांपुर्वी या जोडीने जेजूरीला जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतलं होतं. यावेळी हार्दिकने त्याच्या अर्धांगीनीला उचलून घेतलं होतं. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा या दोघांचा गोड अंदाज प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस उतरत आहे.