Aamir Khan On Marriage Again: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या हटके चित्रपटामुळं नेहमीच चर्चेत असतो. मात्र, हल्ली त्याची चर्चा होतेय ते म्हणते तिसऱ्या लग्नाच्या अफवेमुळं. आमिर खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आहे. किरण राव आणि आमिर यांचा घटस्फोट झाल्यानंतर तो आता पुन्हा एकदा लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या सगळ्या चर्चांवर त्याने मौन सोडलं आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्थीच्या पॉडकास्टवर त्याने तिसऱ्या लग्नाबद्दल स्पष्टच म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानने 1986 साली पहिलं लग्न केलं होतं. रिना दत्तासोबत तो विवाहबंधनात अडकला होता. त्यांना जुनैद आणि आयरा अशी दोन मुलंदेखील आहे. 2002मध्ये रीना आणि आमिर यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर दोन्ही मुलांची कस्टडी रीना दत्ता यांना मिळाली. त्यानंतर 2005मध्ये आमिर खान यांनी किरण रावसोबत लग्न केले. त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे. मात्र, लग्नाच्या 15 वर्षांनंतर 2021मध्ये किरण आणि आमिर खान यांचा घटस्फोट झाला. किरण रावसोबत घटस्फोट झाल्यानंतर आमिर खान तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता या सगळ्या चर्चांवर आमिरने उत्तर दिलं आहे. 


तिसऱ्या लग्नाबद्दल आमिर काय म्हणाला?


आमिर खानने अलीकडेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा आमिरने म्हटलं होतं की, लग्न हे एक कॅनव्हास आहे. जे दोन्ही लोकांवर अवलंबून आहे की कोण कसं त्यात रंग भरते. त्याचवेळी रियाने त्याला प्रश्न विचारला की, तु पुन्हा लग्न करणार का? त्यावर त्याने उत्तर दिलं की, 'मी आता 59 वर्षांचा आहे. मला नाही वाटत मी आता पुन्हा लग्न करु शकेल. मला हे कठिण वाटतंय. सध्या माझ्या आयुष्यात इतकी नाती आहेत की पुन्हा माझ्या कुटुंबाशी जोडला गेलो आहे. माझी मुलं आणि भाऊ-बहिणदेखील आहेत.'


रियाने आमिरला म्हटलं की, आयुष्यात तो कोणत्याही वळणावर लग्न करु शकतो. रियाने चेष्टा करत म्हटलं की, जर मी जाहिरात दिली की, आमिर खान लग्नासाठी नवरी शोधत आहे तर? रियाच्या या म्हणण्यावर आमिरने म्हटलं आहे की, माझ्याकडे वेळ तर नाहीये मी माझ्या जवळच्या लोकांसोबत खुष आहे. सध्या मी एक योग्य व्यक्ती बनण्यासाठी काम करत आहे.