मुंबई: कोरोना व्हायरसची Coroanvirus लागण झालेली बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन Aishwarya Rai Bachchan आणि आराध्या बच्चन यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर संपूर्ण बच्चन कुटुंबीयांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्य बच्चन यांना होम क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार सुरु झाले होते. आज सकाळीच अभिषेक बच्चनला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र, आता ऐश्वर्या आणि आराध्या यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दोघींनाही हलका ताप होता त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने या दोघींना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या नानावटी रुग्णालयात दोघींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.


 



दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर अजूनही नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशभरातील लाखो चाहते अमिताभ बच्चन कोरोनातून लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहेत. अमिताभ बच्चनही उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. 


दरम्यान, काल रात्री घडलेल्या एका घटनेमुळे बच्चन कुटुंबीय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. गुरुवारी मध्यरात्री ऐश्वर्याच्या घरी एक व्यक्ती पिझ्झा घेऊन आल्याची काही छायाचित्रे समोर आली आहेत. आराध्याला पिझ्झा खाण्याची ईच्छा झाली म्हणून पिझ्झा मागवण्यात आल्याचे समजते. मात्र, कोरोनासारखा गंभीर आजार असूनही ऐश्वर्या रायकडून सुरक्षेची काळजी घेत जात नसल्याबद्दल अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती.