मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल हा मोठा चर्चेचा विषय आहे. कधी कोणाचं नातं जुळून येत तर कधी काही जोडपे कायमचे विभक्त होतात. पण आता बॉलिवूड  अभिनेत्री दिया मिर्झा घटस्फोटानंतर पुन्हा विवाह बंधनात अडकणार आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये दियाने उद्योगपती साहिल संघा बरोबर लग्न केलं. पण लग्नानंतर अवघ्या 5 वर्षांमध्ये म्हणजे 2019 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता दुसऱ्यांदा दिया विवाह बंधनात अडकत आहे. वैभव रेखी या बिझनेसमन मित्रासोबत दिया मिर्झा विवाह बंधनात अडकणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी हा विवाह सोहळा रंगणार आहे. निवडक मित्र परिवार आणि कुटुंबाच्या उपस्थितीत हा विवाह पार पडणार आहे. ते दोघे गेल्या वर्षीपासून ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. 



इंडिया टुडेने हे वृत्त प्रसारित केलं आहे. घटस्फोट झाला असला तरी आमच्यातील मैत्री कायम असेल. असं ही ती म्हणाली. तिने घटस्फोट झाल्यानंतर देखील एक वक्तव्य केलं होतं. ''माझ्य़ा प्रोफेशनमुळे मला दु:खी राहण्याची परवानगी नाही. सर्व दुःख सहन करण्याची ताकद मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. 



मी 4 वर्षांची असताना माझे आई-वडील विभक्त झाले. या घटनेला 34 वर्ष उलटून गेली आहेत आणि मी आता 37 वर्षांची आहे. त्यामुळे दुःख सहन करण्याची ताकद माझ्यात आहे. असं दिया म्हणाली. तर पूर्वीच्या सर्व दुःखांवर मात करत ती पुन्हा नव्या आयुष्याला सुरूवात करत आहे.