मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती, आशुतोष भाकरे यानं नांदेड येथील राहत्या घरी आत्मह्या करत सर्वांनाच धक्का दिला. तणावाचा सामना करणारा आशुतोष इतक्या टोकाचं पाऊल उचलेला याची कोणालातही कल्पना नव्हती. पण, अखेर नियतीच्या मनात जे होतं तेच घडलं. आपल्या पतीच्या निधनातून सावरत असतानाच मयुरीनंही मोठ्या धीरानं प्रसंगाला तोंड दिलं. पण, आशुतोषच्या वाढदिवसाच्या वेळी मात्र तिच्या भावनांचा बांध फुटला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आशुडा... या लॉकडाऊनच्या काळात मी विविध प्रकारचे ३० केक बनवले. तुझ्या वाढदिवसासाठी सर्वोत्तम केक बनवण्यासाठीच मी हे करत होते. त्या प्रत्येकाचा पहिला घास तू खाल्लास. ३० वाढदीवस आधीच साजरा करण्याची ही तुझी पद्धत होची का रे...? तू प्रियजनांचे अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेला आहेस', असं म्हणत मयुरीनं या पोस्टची सुरुवात केली. 


आशुतोषचं हे कृत्य लाचारी नसून, हतबलता होती असं म्हणत नैराश्याच्या या आव्हानावर मात करण्याच्या अगदी जवळ असतानाच त्यानं आत्महत्या केल्याचं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं. यामध्ये तिनं तणाव, नैराश्य या परिस्थितीशी आशुतोषची नेमकी कशी झुंज सुरु होती याचाही उलगडा केला आहे. 




इतक्या वेदनांचा सामना करुनही तू माझ्यावर प्रेम करत राहिलास, असं म्हणत बायको तुझी नवसाची हा हॅशटॅग जोडत तिनं ही पोस्ट आवरती घेतली. अतिशय मनापासून मयुरीनं लिहिलेली ही पोस्ट वाचत असताना आपला पती आता कधीच परतणार नसल्याची तिच्या मनातील कालवाकालव लगेचच जाणवत आहे. मयुरीचे हे शब्द वाचताना नकळत डोळे पाणावत आहेत.