Neena Gupta At Panchayat S3 Shooting: बॉलिवूडमध्ये सध्या वेबसिरिजचं वावड आहे. अनेक मोठ मोठे कलाकार हे वेबसिरिजमध्ये काम करत आपलं नशीब आजमावताना दिसत आहेत. सध्या अशाच एक वेबसिरिजची सगळीकडेच चर्चा आहे आणि त्या वेबसिरिजचं नावं आहे 'पंचायत' (Panchayat Web Series). आता पहिले दोन सिझन गाजल्यानंतर या सिरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे या नव्या सिरिजच्या तिसऱ्या सिझनची. सध्या या सिरिजचे शुटिंग सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानिमित्तानं या सिरिजमधील कलाकार हे शुटिंगमधील काही बीटीएस शेअर करताना दिसत आहेत. लोकप्रिय अभिनेत्री नीना गुप्ता यांचीही या सिरिजमध्ये महत्त्वाची भुमिका आहे. सध्या नीना गुप्ता यांनी आपल्या या सिरिजच्या बीटीएसांचचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


नीना गुप्ता ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार आहेत. त्या त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांनी मुलगी मसाबा आणि त्या सोशल मीडियावर (Masaba Gupta) सक्रिय आहेत. त्या अनेकदा आपले व्हिडीओज हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकत्याच त्या दोघी 'मसाबा मसाबा' या वेबसिरिजमध्ये दिसल्या होत्या. या सिरिजचेही दोन सिझन प्रदर्शित झाले आहेत. ही सिरिजही प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सध्या चर्चा आहे ती म्हणजे पंचायत या सिरिजची. तुम्हाला माहिती असेलच की नीना गुप्ता या लोकप्रिय वेस्ट इंडिजचे क्रिकेटर विव रिर्चड्स यांच्या प्रेमात पडल्या होत्या.


हेही वाचा - ''नाकावरच्या रागाला औषध काय?'' गाण्यातील 'ती' दोन लहान मुलं 34 वर्षांनंतर काय करतात?


त्यानंतर त्यांना एक मुलगीही झाली. परंतु विव रिचर्ड्स (Viv Richards) हे तेव्हा विवाहित होते. त्यानंतर ते प्रकरण बरेच गाजले परंतु आपल्या आयुष्यात इतकं सगळं होऊनही नीना गुप्ता या आपल्या करिअरमध्ये तितक्याच यशस्वी ठरल्या आहेत. त्यांचे आयुष्य हे म्हणूनच आजच्या तरूणांना आकर्षिक करते. सध्या त्यांचा एक व्हिडीओ (Neena Gupta Life Story) त्यांनी इन्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्या 'पंचायत 3' या वेबसिरिजचे शुटिंग करताना दिसत आहेत. हे शूटिंग त्या 40 डिग्री सेल्सियसमध्ये करतायत. तेव्हा इतक्या उकाड्यात शुटिंग करण्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्या या व्हिडीओमध्ये (Neena Gupta Video) म्हणतात की, ''येथे खूपच उकाडा आहे. डोक्यावर छत्रीही राहत नाही. डोळ्यात आणि तोंडात उन जातंय. सगळंच जळतंय. मी जेव्हा मुंबईत येईन तेव्हा मला कोणी ओळखणारही नाही.'' त्यांच्या या व्हिडिओवर नेटकरी नाना तऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.