Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमी तिच्या हटके पोस्ट आणि लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते. त्याचबरोबर सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये परिणीती ही एका बोटमधून प्रवास करताना दिसत आहे. मात्र, तिच्या चेहरा खूपच दुखी असल्या सारखा वाटत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते अंदाज लावत आहेत. लग्नाच्या 10 महिन्यांनंतर त्यांच्या लग्नात काही अडचण आली आहे का? असा प्रश्न देखील चाहते उपस्थित करत आहेत. 24 सप्टेंबरला अभिनेत्रीने खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्न केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या परिणीतीचा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना देखील काळजी वाटू लागली आहे. कारण बोटीमध्ये परिणीती दु:खी मनाने बसलेली आहे. तिला काळजी वाटत असल्याचं तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताना लांबलचक कॅप्शन देखील दिलं आहे. या पोस्टमध्ये ती स्वत:च्या आनंदासाठी जगण्याविषयी बोलत आहे. 


परिणीतीच्या पोस्टमध्ये काय? 


अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, या महिन्यात मी स्वत: च्या आयुष्यावर विचार करण्यासाठी काही काळ थांबले आणि त्यामुळे माझा विश्वसा पुन्हा एकदा पक्का झाला आहे. ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्या गोष्टींना किंवा माणसांना महत्त्व देऊ नका. एक सेकंदही वाया घालवू नका. आयुष्य हे एक टिकणारे घड्याळ आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण तुमची निवड असावी. कृपया इतरांसाठी जगणे थांबवू नका. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तुम्हाला जसे जगायचे आहे तसे जगा


तिने पुढे म्हटले की, तुमची टोळी शोधा आणि विषारी लोकांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढायला घाबरू नका. जगाला काय वाटते याची काळजी तुम्ही करु नका. परिस्थितींवर तुमची प्रतिक्रिया बदला. आयुष्य मर्यादित आहे. तुम्हाला जसे जगायचे आहे तसे जगा.


चाहते नाराज


अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज लावले आहेत. लग्नाच्या 10 महिन्यांनंतर अभिनेत्रीची ही वादग्रस्त पोस्ट पाहून चाहते देखील नाराज झाले आहेत. काही चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करून ही पोस्ट कोणासाठी आहे? असं प्रश्न देखील तिला विचारला आहे. तर काही चाहत्यांनी म्हटलं आहे की, आपल्या सर्वांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागेल असे दिसते. तर काहींनी लग्नानंतर काळजी वाटते का? असा प्रश्न केला आहे.