मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या वादग्रस्त मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत कंगनाने आदित्य पांचोली, हृतिक रोशनसहीत बॉलिवूडशी निगडीत अनेक खुलासे केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाच्या या वक्तव्यांवर हृतिकने अजूनही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण दुसरीकडे आदित्य पांचोली, सूरज पांचोली आणि आदित्यची पत्नी झरीना वहाब यांनी कंगनावर चांगलीच आगपाखड केली आहे. कंगनाने मुलाखतीत खुलासा केला होता की, आदित्यने तिला अनेकदा शारिरीक त्रास दिला आहे. 


इतकेच नाहीतर कंगना त्याच्याविरोधात पोलिसातही गेली होती. आदित्यची पत्नी झरीना वहाब यांनी नुकत्याचा एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, कंगनाचे सगळे आरोप खोटे आहेत.


झरीना यांनी म्हटले होते की, कंगना ही आदित्यसोबत चार वर्ष रिलेशनशीपमध्ये होती. झरीना द्वारे करण्यात आलेल्या वक्तव्यावर कंगनाची बहीण रंगोली चंदेलने ट्विटवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या रंगोलीने विचारले आहे की, ‘जर कंगना आणि आदित्य २००५ मध्ये भेटले होते आणि कंगनाने २००७ मध्ये वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती, तर दोघे साढे चार वर्ष रिलेशनमध्ये कसे होते?’.









दरम्यान, आदित्य पांचोलीवर कंगनाने अनेक गंभीर आरोप केले असून आदित्य हा कंगनाविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यामुळे कंगनाला याचा फटका बसणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. तर हृतिक यावर काय बोलणार? याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.