मुंबई : साधारण एक दशकापूर्वी अस्सल विनोदामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेली स्टार प्लसवरील 'खिचडी' प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीला येत आहे. तब्बल १२ वर्षांनंतर दुसऱ्या पर्वात ही मालिका पुन्हा एकदा भेटीला येत असल्याने प्रेक्षांमध्येही उत्साह आहे. कारण, पुन्हा एकदा अस्सल विनोदाची मेजवानी प्रेक्षकांना मिळेल अशी चर्चा आहे. 'खिचडी' आता 'खिचडी रिटर्न्स' नावाने प्रसारित केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या पर्वासाठी 'खिचडी २'ची टीमही सज्ज असून, पुर्वानुभव पाहता येत्या काळात विनोदी मालिकांच्या यादीत 'खिचडी २'ला वरचे स्थान मिळाले नाही तर, आश्चर्य वाटायला नको. पहिल्या प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करण्यात 'खिचडी २' पूर्णपणे यशस्वी ठरली होती. पण, त्याला आता १२ वर्षांचा काळ उलटून गेला आहे. त्यामुळे सहाजिकच बदलत्या काळानुसार प्रेक्षकांची अभिरूचीही वाढली आहे. ही अभिरूची 'खिचडी २' पूर्ण करेल अशी आशा आहे.



दरम्यान, 'खिचडी २'चे प्रमोही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. छायाचित्रपत्रकार विरल भायानी यांनी इंस्टग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात 'खिचडी २' नव्या टीमसोबत पुनरागमन करताना दिसत आहे.  मालिकेच्या निर्माती टीमनेही फएसबुकवर 'खिचडी'च्या प्रमोचा व्हिडिओ शेअर केला आहे. 'खिचडी' आता 'खिचडी रिटर्न्स' नावाने प्रसारित केली जाणार आहे. १४ एप्रिलला स्टार प्लसवरूनह ही मालिका शनिवार आणि रविवार असे दोन दिवस रात्री ८ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्य भेटीला येत आहे.