मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या प्रेक्षकांना गरबा क्विन दयाबेन पुन्हा कधी येणार? आणि पत्रकार पोपटलालचं लग्न कधी होणार असा प्रश्न सतावत आहे. मालिकेतील फक्त दयाबेन आणि पोपटलाल चाहत्यांच्या मनात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं नाही तर सर्व पात्र चाहत्यांच्या जवळचे आहेत. मालिकेतील मंडळी कायम सोसल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. शिवाय ते त्यांच्या जीवनातील घडामोडी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक चाहत्याला त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आणि प्रोफेशनल लाईफबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. आता मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा पदार्पण करणार आहे. मालिकेमध्ये दयाबेन नाही तर  रीटा रिपोर्टर (Rita Reporter) व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा (Priya Ahuja) 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत पुन्हा पदार्पण करणार आहे. 



सांगायचं झालं तर प्रेग्नेंसीनंतर प्रिया मालिकेपासून दूर आहे. प्रियाने मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदासोबत लग्न केलं आहे. सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती फोटो आणि व्हिडिओ शअर करत असते. 


चाहते दयाबेनच्याही प्रतीक्षेत
मालिकेत दयाबेन कधी पुन्हा पदार्पण करणार याबद्दल काही कळू शकलेलं नाही. चाहते देखील दयाबेनच्या प्रतीक्षेत आहेत. दयाबेनच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. रीटा रिपोर्टर (Priya Ahuja) च्या वापसीनंतर आता दयाबेन देखील येणार असा अंदाय व्यक्त करत आहेत.