मुंबई : बॉलिवूडमध्ये यश सहजचं मिळतं नाही. पण कष्टासोबतचं नशिबाची साथ  हवी  असते असं देखील म्हणतात. अभिनेता अक्षय खन्नाने 'रेस', 'दिल चाहता है' अशा अनेक सिनेमांमध्ये मुख्य भुमिका साकारली. पण आता अक्षय बॉलिवूडपासून दूर आहे. अक्षयने बॉलिवूडमध्ये जेवढं काम केले, ते कमालीचं होतं. महत्त्वाचं म्हणजे अक्षयने अजून लग्न केलेलं नाही. हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आतापर्यंत कोणाला मिळालं नाही. अनेक वेळा असं सांगितलं जायचं की  अक्षय खन्ना आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचं लग्न होणार होत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण हे लग्न होवू शकलं नाही. रणधीर कपूर यांनी करिश्मासाठी विनोद खन्ना यांचे पुत्र अक्षय खन्नाला मागणी घातली  होती. परंतू करिश्मा कपूरची आई बबिता यांना हे लग्न मान्य नव्हतं. करिश्माच्या करियरमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे नको. असं करिश्मा कपूरच्या आईचं मत होतं. एकदा तर अक्षय खन्ना यांनी सांगितलं होतं की, त्याला तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता आवडत होत्या.



सांगायचं झालं तर, अक्षयने फक्त मुख्य भुमिकाचं पार पाडली नाही तर त्याने खलनायकाच्या भुमिकेला देखील तितकचं न्याय दिलं. 'हमराज' सिनेमामध्ये त्याने उत्तम खलनायकाची भुमिका साकारली. रेस सिनेमातील त्याच्या भुमिकेने प्रेक्षकांच्या मनात घरं केलं. अक्षय अखेर '375' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला.