मुंबई : बॉलिवूडचे बाजीराव - मस्तानी म्हणजे दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाच्या तारखेचा खुलासा झाला आहे. प्रत्येकजण या लग्नावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रानंतर आता अक्षय कुमारने या कपलबद्दल स्टेटमेंट केलं आहे. हे वाक्य ऐकून स्वतः रणवीर देखील हैराण झाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

21 ऑक्टोबर रोजी बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक - निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण' या शोचा 6 वा सिझन प्रसारित झाला. शोच्या सुरूवातीला बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण आल्या होत्या. या दोघींनी अनेक खुलासे केले आहेत. कॉफी विथ करणच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. 



या एपिसोडमध्ये आता अक्षय कुमार आणि रणवीर सिंह आले आहेत. यावेळी कॉफी विथ करण 6 चा हा दुसरा भाग आहे. या शोमद्ये करण जोहरच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या दोघांनी दिली. आपल्या आयुष्यातील अनेक हिस्से त्यांनी दाखवले आहेत. रणवीर सिंहची एनर्जी बघून अक्षय देखील हैराण आहे. 


यावेळी दीपिका आणि रणवीरबद्दल अक्षय बोलला की, या माणसासोबत राहणं म्हणजे हॅट्स ऑफ टू दीपिका... अक्षयच्या या म्हणण्यावर करण आणि स्वतः रणवीर खूप हैराण झाला.