मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार एका नवा वादात अडकला असल्याचं चित्र आहे. अक्षय कुमारने केलेल्या निरमा पावडरच्या जाहिरातीमुळे चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. निरमा पावडरच्या जाहिरातीतून अक्षय कुमार आणि इतर कलाकार मावळ्यांच्या वेशात लढाईनंतर पुन्हा दरबारात परतल्याचं जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. अशाप्रकारे मावळ्यांच्या वेशात दाखवण्यात आलेल्या जाहिरातीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याची संतप्त भावना शिवप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निरमाच्या या जाहिरातीवर बंदी आणण्यात यावी, तसेच अक्षयनेही याबाबत माफी मागण्याची मागणी व्यक्त करण्यात येत आहे. 





मावळे दाखवण्यात आलेले कलाकार दरबारात परतल्यानंतर महाराणी त्यांचं औक्षण करण्यासाठी येतात. त्यांच्या खराब झालेल्या कपड्यांवरुन महाराणीची प्रतिक्रिया आल्यानंतर, मावळे निरमा पावडरने आपले कपडे धुवत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या जाहिरातीमुळे शिवप्रेमींमध्ये चांगलाच संताप दिसून येतोय. अक्षयच्या या जाहिरातीचा निषेध करत सोशल मीडियावर #ApologizeAkshay हा हॅशटॅग सुरु असून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.