मुंबई : 'सुल्तान','टायगर झिंदा है' नंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक 'अली अब्बास जफर' ही जोडी बॉक्सऑफिसवर आता 300 कोटीची कमाई करण्याची हॅट्रिकच्या तयारीत आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रेस 3' या चित्रपटाचे शूटिंग आटपल्यानंतर आता सलमान खान लवकरच 'भारत' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. नुकताच 'भारत' चित्रपटाच्या निर्मात्यांनी या आगामी चित्रपटच्या मुहुर्ताची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 


ईद 2019च्या मुहुर्तावर येणार सिनेमा 


सलमान खान दरवर्षी ईदच्या मुहुर्तावर त्याच्या चाहत्यांसाठी 'ईदी' म्हणून एक सिनेमा घेऊन येतो. यंदा 'रेस 3' तर पुढील वर्षी म्हणजेच 2019 च्या ईदला 'भारत' हा सिनेमा येणार आहे. भारत चित्रपटातील इतर कलाकारांची नावं अजूनही गुलदस्त्यामध्ये आहेत. 


 



कोरियन सिनेमाचा रिमेक


'ऑड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. 'भारत' या चित्रपटाला भारत- पाकिस्तान फाळणीची पार्श्वभूमी आहे. या चित्रपटाची कथा देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार्‍या एका मुलाच्या जिद्दीची कथा आहे. अखेर रात्री 2 वाजता सलमान खानचा 'बॅकफ्लिप'चा प्रयत्न ठरला यशस्वी