मुंबई : आता एक मनोरंजन विश्वातून सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. द कपिल शर्मा सीरियलचं हृदय आणि उत्तम अभिनय करणाऱ्या अभिनेत्यानं शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठी खळबळही उडाली आहे. त्याने असं का केलं यामागचं कारण अभिनेत्यानं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अली असगर या अभिनेत्यानं द कपिल शर्मा शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं दादी हे कॅरेक्टर खूप जास्त प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे त्याला एक वेगळी ओळखही मिळाली आणि लोकप्रियताही. मात्र आता हा शो सोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत. 


'एका अहवालानुसार अली असगरने काही मतभेदांमुळे 'द कपिल शर्मा शो' सोडला. 'हे  अत्यंत दुर्दैवी आहे. अशा काही गोष्टी होतात त्यामुळे तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. आम्ही एका कुटुंबासारखं काम केलं. मी शो आणि ते स्टेज खूप मी करतोय' असंही अली यावेळी बोलताना म्हणाला. 



'एक वेळ अशी आली की मला प्रोफेशनली आता बस खूप झालं असं वाटायला लागलं. काही मतभेदांमुळे मी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी तेच तेच करत होतो. त्यामुळे तिथे काही इम्प्रुमेंट करण्यासाठी स्कोपच नाही असं वाटत होतं. '


अली असगर ओटीटी शो देखील करणार नाही असं एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता. कॉमेडियन म्हणून जी ओळख झाली त्यानंतर आता दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत लोक स्वीकारणार नाहीत असं मला वाटतं. मी टीव्हीवरच दुसऱ्या भूमिका करेन मात्र OTT वर येणार नाही असंही तो म्हणाला. 


कपिल शर्मा शोमुळे 2017 मध्ये सुनील ग्रोवरने देखील हा शो सोडला होता. त्यानंतर आता पुन्हा त्याच वादामुळे अली असगरने शो सोडल्याची माहिती मिळाली आहे. अलीला प्रेक्षक आणि चाहते खूप मिस करणार आहेत.