मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या या दोघांचीही करिअर अगदी चांगल्या उंचीवर आहे. आताच रिलीज झालेल्या 'राझी'ने वर्ल्डवाईड 200 करोड रुपयांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे 'संजू' या सिनेमाने देखील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या सगळ्यात अशी देखील चर्चा झाली की, आलिया - रणबीर लवकरच लग्न करणार आहे. आणि यावर आलियाने स्वतः उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाने सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर 'आस्क मी ऐनिथिंग' हे सेशन सुरू केलं आहे. यावरून आलियाचे फॅन्स अगदी तुटून पडले. असंख्य प्रश्नांमधून आलियाने काहीशा प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यामध्ये आलियाच्या एका फॅनने विचारलं की, तू लग्नानंतर अभिनय करणं सोडणार आहेस का? 



या प्रश्नावर उत्तर देताना आलिया म्हणाली की, आपल्या स्टेटसना बदलण्यासाठी काही करण्याची गरज नाही. लग्नानंतर काम सोडण्याची काही गरज नाही. मी जोपर्यंत काम करू शकेन तोपर्यंत मी काम करणार आहे. आपल्याला माहितच आहे आलिया - रणबीर सध्या ब्रम्हास्त्र या सिनेमांत व्यस्त आहे. आलिया रणबीरच्या अपोझिट रोल करत आहे. या सिनेमा अमिताभ बच्चन देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे. याशिवाय आलिया 'गुल्ली बॉय', 'कलंक' आणि 'शुद्धि' या सिनेमांत देखील दिसणार आहे.