मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. बी- टाऊनमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी कपल्सच्या यादीत या जोडीचा समावेश होतो. अशी ही बहुचर्चित जोडी येत्या काळात ब्रह्मास्त्र या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाराणासी येथे या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं. पण, त्यादरम्यानच आलियाला मुंबईला परतावं लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्येतीत अचानक बिघाड झाल्य़ामुळे ती मुंबईत परतली आहे. चित्रीकरण संपण्याच्या अवघ्या तीन दिवस आधीच ही कलाकार मंडळी मुंबईत परतली आहेत. 'स्पॉटबॉय'ईने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार खुद्द रणबीरच आलियाला मुंबईत घेऊन आला. पण, इथे मात्र आलिया आणि रणबीर एकमेकांसोबत काही निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी परतल्याच्याच चर्चा रंगत आहेत.  


 


 



चर्चा काहीही असो, आलियाची तब्येत बिघडल्यामुळेच तिला काही दिवस विश्रांती मिळावी याकरता ती मुंबईत परतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही एकंदर परिस्थिती पाहता दिग्दर्शक अयान मुखर्जी यानेही काही दिवसांसाठी चित्रपटाचं चित्रीकरण बंद ठेवलं आहे.  ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीर पहिल्याच वेळेस स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे चर्चे असणाऱ्या त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा गाजणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


आलिया आणि रणबीरच्या नात्याविषयी सांगावं तर, अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नसोहळ्याच्या वेळी म्हणजेच साधारण वर्षभरापूर्वी ही जोडी माध्यमांसमोर पहिल्यांदाच एकत्र आली होती. काही दिवसांपूर्वी तर त्यांच्या साखरपुडा आणि लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. पण, या दोन्ही कलाकारांनी मात्र यापैकी कोणत्याच वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.